
अनुशासन के नाम पर, अनुशासन का खून
भंग कर दिया संघ को, कैसा चढ़ा जुनून
कैसा चढ़ा जुनून, मातृपूजा प्रतिबंधित
कुलटा करती केशव-कुल की कीर्ति कलंकित
यह कैदी कविराय तोड़ कानूनी कारा
गूंज गा भारतमाता- की जय का नारा।
भारतीय स्वातंत्र्यानंतरचा इतिहास अनेक घटनांनी भरलेला आहे. या इतिहासात १९७५-७७ च्या काळातील आणीबाणी हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने २५ जून १९७५ रोजी देशभरात आणीबाणी लागू केली. या काळात लोकशाही, स्वातंत्र्य आणि अधिकारांवर गदा आणण्यात आली. या संकटाच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारतीय संविधानाचे संरक्षण करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
इंदिरा गांधींना आणीबाणी मागे घेण्यास आणि भारतात लोकशाही पुनर्संचयित करण्यास भाग पाडण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला क्वचितच कोणत्याही प्रामाणिक, निष्पक्ष लेखकाने श्रेय दिले असेल.

आणीबाणीच्या घोषणेनंतर देशभरात अनेक राजकीय नेत्यांना अटक करण्यात आली, माध्यमांवर नियंत्रण ठेवण्यात आले आणि नागरी हक्कांवर निर्बंध लादण्यात आले. या काळात देशातील जनतेला त्यांच्या मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवण्यात आले. स्वातंत्र्य, न्याय आणि समता यांची गळचेपी झाली. अशा परिस्थितीत संविधानाचे संरक्षण करणे ही देशप्रेमींची जबाबदारी होती, त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्वात पुढे होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतातील एक सामाजिक आणि सांस्कृतिक संघटना आहे. या संघटनेचे मुख्य ध्येय भारताच्या प्राचीन सांस्कृतिक आणि नैतिक मुल्यांचे जतन आणि संवर्धन करणे आहे. आणीबाणीच्या काळात संघाने भारतीय संविधान आणि लोकशाही मुल्यांचे संरक्षण करण्यासाठी पुढाकार घेतला व समाज मनात देशभक्तीची विझलेली ज्वाला पुन्हा पेटवली.
आणीबाणी जाहीर झाल्यानंतर लगेचच मोठ्या संख्येने संघाचे नेते आणि कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. तत्कालीन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांना नागपूर रेल्वे स्थानकावर अटक करून पुण्याजवळील येरवडा तुरुंगात डांबण्यात आले होते. देशातील तुरुंग आरएसएसच्या स्वयंसेवकांनी भरून गेले होते. “लोक विरुद्ध आणीबाणी: संघर्षाची गाथा” नुसार आंतरिक सुरक्षा व्यवस्था अधिनियम (Maintenance of Internal Security Act (MISA)) अंतर्गत अटकेत असलेल्या संघ स्वयंसेवकांची संख्या २२,९३८ पुरुष आणि ७७ महिला कार्यकर्त्यांसह २३,०१५ होती.
संघाच्या सत्याग्रहाला प्रचंड प्रतिसाद मिळाला, ५३४९ ठिकाणी दीड लाखाहून अधिक लोकांनी सत्याग्रह केला. त्यापैकी ८० हजार संघाचे स्वयंसेवक होते. त्यापैकी ४४,९६५ जणांना डीआयआर आणि मिसा अंतर्गत अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये २४२४ महिलांचाही समावेश आहे. आणीबाणीच्या काळात संघाचे ८७ स्वयंसेवक हुतात्मा झाले. इतर पक्षांच्या केवळ ९,६५५ लोकांनी सत्याग्रह केला. इंदिरा गांधींच्या कबुलीजबाबावरून संघाची क्षमता आणि ताकद कळू शकते. संघाला दडपण्याचे सर्व प्रयत्न करूनही इंदिरा गांधींना हे मान्य करावे लागले की, “आम्ही संघाच्या १० टक्के कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेऊ शकलो नाही. ते सर्व भूमिगत झाले आहेत आणि संघावर बंदी घातल्यानंतरही विखुरली नाही, उलट केरळसारख्या नवीन भागात मूळ धरत आहे.” (द पीपल व्हर्सेस इमर्जन्सी: अ सागा ऑफ स्ट्रगल, १९९१, पृ. २१)
संघाने आणीबाणीच्या काळात अनेक गुप्त आंदोलन चालवले, संघाच्या स्वयंसेवकांनी भूमिगत राहून इंदिरा गांधी सरकारविरोधी प्रचार आणि जनजागृती केली. अनेक स्वयंसेवकांनी त्यांची ओळख लपवून देशभरात संविधान आणि लोकशाहीचे महत्त्व पटवून दिले त्यापैकी एक श्री. नरेंद्र मोदी जी. त्यांनी जनतेमध्ये सरकारच्या अन्यायकारक कृतींचा पर्दाफाश केला आणि लोकांना त्यांच्या हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा दिली. आज “संविधान बचाओ” ओरडणाऱ्यांना हे चांगल्या प्रकारे माहिती आहे की आणीबाणी नंतर आज भारतात संविधान आहे ते फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे. तरी सुद्धा वोंट बँकच्या लालचेपाई “संविधान बचाओ” ओरडणारे विशेषतः ७०-८० च्या दशकात युवा अवस्थेत असलेले इंडि आघाडीचे नेते तेव्हा मुग गिडून गप्प होते जेव्हा इंदिरा गांधीने आणीबाणी लादली होती. तेव्हा आणीबाणीचे समर्थक आज संघा पासून “संविधान बचाओ” म्हणताय ज्या संघाने देशसेवेसाठी, देशहितासाठी आणि संविधान रक्षणासाठी अग्निपथ या मार्गाचा स्वीकार केला.
आणीबाणीच्या काळात माध्यमांवर कडक निर्बंध लादण्यात आले होते. त्यामुळे सत्य परिस्थिती जनतेपर्यंत पोहोचणे कठीण झाले होते. या स्थितीत संघाने गुप्तपणे पत्रके, पुस्तिका आणि इतर साहित्य वितरित केले. संघाच्या सदस्यांनी विविध मार्गांनी जनतेपर्यंत माहिती पोहोचवली आणि लोकांमध्ये जागृती निर्माण केली. संघाच्या अनेक सदस्यांनी सत्याग्रहाचे आयोजन केले. त्यांनी आणीबाणीविरोधात शांततापूर्ण आंदोलन केले. यामुळे अनेक स्वयंसेवकांना अटक झाली आणि त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. परंतु, त्यांनी आपल्या उद्दिष्टांपासून विचलित न होता संघर्ष निरंतर सुरु ठेवला. त्यांच्या या अतुलनीय बलिदानामुळे लोकशाहीच्या मूल्यांची जपणूक झाली व भारतीय संविधानचे रक्षण झाले.

१९७७ साली आणीबाणी उठवली गेली आणि लोकसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये जनता पार्टीने विजय मिळवला आणि इंदिरा गांधींचे सरकार पराभूत झाले. आणीबाणीच्या विरोधात लढा देणाऱ्या अनेक संघटनांमध्ये संघाचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरला. त्यांनी भारतीय संविधानाचे संरक्षण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे फळ देशाला मिळाले. संघाने आणीबाणीच्या काळात भारतीय संविधान आणि लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठी दिलेले योगदान अनुकरणीय आहे. त्यांनी गुप्त आंदोलन, प्रचार, सत्याग्रह आणि बलिदान यांच्या माध्यमातून संविधानाचे रक्षण केले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे देशात लोकशाहीचे मूल्य पुनर्स्थापित झाले.
आणीबाणीच्या काळातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे योगदान हे भारतीय संविधानाच्या रक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले आहे. संघाच्या सदस्यांनी त्यांच्या कार्यकुशलतेने, समर्पणाने आणि धैर्याने भारतीय लोकशाहीचे संरक्षण केले. आजही, देशातील अनेक नागरिकांनी त्यांच्या या बलिदानाचा आदर करावा आणि लोकशाहीचे मूल्य जपावे अशी अपेक्षा आहे. संघटनेच्या या कार्यामुळे देशातील संविधानिक आणि लोकशाही व्यवस्था अधिक मजबूत झाली आहे यात तीळमात्र शंका नाही.
तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष देवकांत बरुआ यांनी इंदिरा गांधी यांची भारतमातेशी तुलना केली तेव्हा अटलजी गप्प बसू शकले नाही, त्यांनी तीक्ष्ण व्यंग्यांसह ही टीका केली –
इंदिरा इंडिया एक है: इति बरूआ महाराज,
अकल घास चरने गई चमचों के सरताज,
चमचां के सरताज किया अपमानित भारत,
एक मृत्यु के लिए कलंकित भूत भविष्यत्,
कह कैदी कविराय स्वर्ग से जो महान है,
कौन भला उस भारत माता के समान है?

References:-
https://frontline.thehindu.com/politics/rss-emergency/article64760048.ece
https://organiser.org/2023/06/25/180596/bharat/role-of-rss-during-the-dark-period-of-1975-emergency/
https://swarajyamag.com/politics/the-rss-and-emergency
https://www.thenewsminute.com/news/emergency-and-sangh-parivar-s-tacit-support-indira-gandhi-178951